टोमॅटो शेती साठी खत व पाणी व्यवस्थापन

खत व्यवस्थापन :

  एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन :   माती परीक्षण करून संतुलित प्रमाणात खते वापरावीत.  अ) सेंद्रिय खते ः  प्रतिहेक्‍टर २० टन शेणखत व २०० किलो निंबोळी पेंड. ब) रासायनिक खते ः  मध्यम प्रकारच्या जमिनीस संकरीत वाणासाठी हेक्‍टरी ३०० किलो नत्र, १५० किलो स्फुरद व १५० किलो पालाश. तसेच सुधारित सरळ वाणासाठी हेक्‍टरी २०० किलो नत्र, १०० किलो स्फुरद व १०० किलो पालाश घ्यावे.  याशिवाय संकरीत व सुधारीत आणि सरळ वाणासाठी हेक्‍टरी २५ किलो फेरस सल्फेट, २५ किलो मॅगनीज सल्फेट, ५ किलो बोरॅक्‍स आणि २५ किलो मॅग्नेशियम सल्फेट द्यावे. माती परीक्षणानुसार खतांच्या मात्रांमध्ये बदल करावेत.  क) जैविक खते ः  एकरी २ किलो ॲझोटोबॅक्‍टर, २ किलो स्फुरद विरघळविणारे जीवाणू व २ किलो पालाश विरघळविणारे जीवाणू हे सर्व १ टन शेणखतात मिसळून द्यावे. खते देताना निम्मे नत्र, संपूर्ण स्फुरद आणि पालाश लागवडीच्या वेळी द्यावे. राहिलेले निम्मे नत्र १५, २५, ४० व ५५ दिवसांनी समान हप्त्यांमध्ये विभागून बांगडी पद्धतीने झाडाच्या बुंध्यापासून थोड्या अंतरावर मुळाच्या क्षेत्रात द्यावे. खते दिल्यानंतर ताबडतोब पाणी द्यावे. या व्यतिरिक्त सूक्ष्म आणि दुय्यम अन्नद्रव्य लागवडीनंतर ५ ते ७ दिवसांनी द्यावेत.

पाणी व्यवस्थापन :

  पाणी व्यवस्थापन करताना जमिनीचा मगदूर व हवामान या गोष्टी विचारात घ्याव्यात.  हलक्‍या जमिनीत पाण्याच्या पाळ्या जास्त द्याव्यात व त्यामानाने चांगल्या जमिनीत पाण्याच्या पाळ्या कमी द्याव्यात.  लागवडीनंतर लगेच पाणी द्यावे. त्यानंतर आंबवणीचे पाणी द्यावे.  पिकांच्या सुरवातीच्या काळात पाणी जास्त झाल्यास पानांची व फांद्यांची वाढ जास्त होते. म्हणून फुलोरा येईपर्यंत लागवडीपासून अंदाजे ६५ दिवसांपर्यंत पाणी बेताने द्यावे.  ठिबक संचामधून पाणी देताना पिकाची दैनंदिन पाण्याची गरज निश्‍चित करून तेवढेच पाणी मोजून द्यावे.  फुले लागण्याच्या काळात पाण्याचा ताण पडल्यास फुले व फळे गळणे, फळधारणा न होणे या समस्या निर्माण होतात.  पाणी सतत आणि जास्त दिल्यास मुळांना हवेचा पुरवठा होत नाही. झाडाची पाने पिवळी पडतात व उत्पादनात घट येते.  पावसाळ्यात पावसाच्या पाण्याच्या उपलब्धतेनुसार पाणी द्यावे. हिवाळ्यात ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे व उन्हाळ्यात ६ ते ८ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.

पीएम किसान मानधन योजनेसाठी अर्ज कसा करावा.

पीएम किसान मानधन योजनेसाठी अर्ज कसा करावा.

प्रधानमंत्री किसान मानधन योजना (PM-KMY) ही एक सरकारी योजना आहे ...
पंचायत समिती व जिल्हा परिषदेमार्फत सायकल कोळपे यंत्र अनुदान व वाटप योजना | jilha parishad agri Machinery Subsidy scheme

पंचायत समिती व जिल्हा परिषदेमार्फत सायकल कोळपे यंत्र अनुदान व वाटप योजना | jilha parishad agri Machinery Subsidy scheme

शेती हा महाराष्ट्रातील प्रमुख व्यवसाय आहे. शेतकऱ्यांच्या श्रमातूनच राज्याची अर्थव्यवस्था ...
फक्त मोबाइल नंबर टाका आणि कोणाचेही लाईव्ह लोकेशन पहा |location tracker app download

फक्त मोबाइल नंबर टाका आणि कोणाचेही लाईव्ह लोकेशन पहा |location tracker app download

जेव्हा तुमच्या कुटुंबातील व्यक्ती जेव्हा घराबाहेर पडते तेव्हा त्या व्यक्तिच्या ...
groww ॲप डाऊनलोड करा

groww ॲप डाऊनलोड करा

groww ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा ???????? groww ...
पिक विमा नुकसान भरपाई| ३५ लाख शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात २५ टक्के पीकविमा मिळाला

पिक विमा नुकसान भरपाई| ३५ लाख शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात २५ टक्के पीकविमा मिळाला

शेतकऱ्यांना दिवाळी साठी आर्थिक मदत देण्यासाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे ...
युट्युब वर व्हिडिओ टाकून पैसे कमवा | earn money from YouTube.

युट्युब वर व्हिडिओ टाकून पैसे कमवा | earn money from YouTube.

आज काल आपण पाहतो की समाजामध्ये नोकरीचे प्रमाण हे खूप ...
नागपूर-गोवा शक्तीपीठ एक्सप्रेसवे गावांची यादी पहा. |Shaktipeeth expressway village list.

नागपूर-गोवा शक्तीपीठ एक्सप्रेसवे गावांची यादी पहा. |Shaktipeeth expressway village list.

Shaktipeeth expressway नागपूर-गोवा शक्तीपीठ एक्सप्रेसवे हा महाराष्ट्रातील एक महत्वाकांक्षी प्रकल्प ...
बोअरवेल अनुदान योजना | बोअरवेल मारण्यासाठी २०००० रूपये अनुदान मिळेल.

बोअरवेल अनुदान योजना | बोअरवेल मारण्यासाठी २०००० रूपये अनुदान मिळेल.

भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. शेती हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा ...
हवामान अंदाज बरोबर सांगितला पण, पंजाबराव डख यांचे 5 एकर शेत वाहून गेले.

हवामान अंदाज बरोबर सांगितला पण, पंजाबराव डख यांचे 5 एकर शेत वाहून गेले.

पंजाबराव डख हे हवामान खात्याचे प्रसिद्ध अभ्यासक असून त्यांनी शेतकऱ्यांना ...

Leave a Comment